`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:13

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.

मुंबईत पाऊस सुरूच, हाय टाईडचा धोका

Last Updated: Thursday, July 5, 2012, 10:09

मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. तसंच आज मुंबईच्या समुद्रात मोठी हाय टाईड असून लाटांची उंची ४.८३ मीटर्स असणार आहे. दुपारी १.३४ मिनिटांनी ही भरती असणार आहे.

महापौर म्हणतात, मुंबईत पाणी भरलं कुठे?

Last Updated: Friday, June 29, 2012, 21:35

मुंबईत बुधवारी रात्रभर पडणाऱ्या पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवले. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं ऑफिसला जाणा-यांचे हाल झाले.

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:52

मुंबईत रात्रभर बरसलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं धावत आहे. तर हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या हजेरीनं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय.