Last Updated: Saturday, December 14, 2013, 21:08
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.