Last Updated: Sunday, May 25, 2014, 22:18
आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
Last Updated: Saturday, February 22, 2014, 16:13
नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.
Last Updated: Friday, February 21, 2014, 12:39
औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.
Last Updated: Wednesday, November 20, 2013, 11:42
नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.
Last Updated: Tuesday, March 5, 2013, 20:49
नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही
Last Updated: Wednesday, February 6, 2013, 09:35
गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...
Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:54
गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांच्या कामात पैशाचा मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ खात्याच्या प्रधान सचिवासह 26 अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Last Updated: Friday, July 27, 2012, 23:57
गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.
Last Updated: Saturday, June 2, 2012, 17:53
गोदावरीच्या पाणवेलींचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. महापौरांनी पहाणी दौरा केला. स्थायी समिती सभापतींनी पाणवेली काढण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्री छगन भूजबळ यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. एवढं होऊनही प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही.
Last Updated: Sunday, May 20, 2012, 16:48
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.
Last Updated: Thursday, May 10, 2012, 23:54
नाशिकचा अभिमान असणारी गोदामाई सध्या तिचं सौंदर्यच हरवून बसलीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी पानवेलींच्या विळख्यात सापडलीय. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.
आणखी >>