Last Updated: Friday, December 13, 2013, 12:36
मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.