बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:58

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

गोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 19:16

केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:16

गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 09:24

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

भारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!

Last Updated: Monday, September 2, 2013, 13:58

भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.

अमेरिकेला नाशिकची द्राक्षं आंबट!

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 12:24

नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला असला तरी अमेरिकेला मात्र ही द्राक्षं आंबट लागत आहेत. FDI ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असताना अमेरिका द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी निर्माण करत आहे.

मराठी मिरच्यांचा विदेशी झटका

Last Updated: Thursday, August 23, 2012, 14:22

मिरची निर्यातीच्या माध्यमातून एक सामन्य शेतकरी विदेशात देशाचं नाव उज्ज्वल करतोय. धुळे जिल्ह्यातील चिचखेडा येथे राहणा-या अल्प शिक्षित अनिल पाटील या शेतक-याने बाजारपेठेचं गणित समजून घेत हे कामगिरी बजावलीय. गुणवत्तेच्या जोरावर उत्पादीत केलेली मिरची थेट लंडन,रशिया आणि दुबईत पाठवण्याचा धाडसी पराक्रम त्यांनी केला आहे.

कापूस निर्यातीवरील बंदी मागे

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:46

केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.

.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!

Last Updated: Sunday, March 11, 2012, 18:58

कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:52

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:57

केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.