धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:25

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 23:09

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:44

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

Last Updated: Thursday, July 12, 2012, 09:30

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.

वनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 13:46

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

योजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना

Last Updated: Saturday, June 2, 2012, 19:14

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

वाघ, राज आणि वनमंत्री

Last Updated: Saturday, June 2, 2012, 00:04

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 21:45

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 21:18

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

नेते करतायेत धावपळ दुष्काळ निवारणासाठी

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 19:28

राज्यातल्या दुष्काळाच्या झळा आता अधिकच तीव्र आणि राजकीय होऊ लागल्या आहेत. पश्चिम दुष्काळावरुन सर्वपक्षीय आमदारांची ओरड सुरु झाल्यानंतर आता दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून धावपळ सुरु झाली आहे.

अफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 19:16

राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.

अफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:06

सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.

पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर

Last Updated: Monday, February 20, 2012, 08:42

मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी बाजूही सावरुन घेतली

सांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 13:38

सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.

अजितदादा विरुद्ध पतंगराव सामना रंगणार?

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:11

पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.

चारा-पाण्यासाठी पतंगरावांना महिलांचा घेराव!

Last Updated: Thursday, January 5, 2012, 18:01

पाणी आणी चाऱ्याच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम यांना मीरज पूर्व भागातील दुष्काळग्रस्त महिलांनी आज घेराव घातला. कदम यांची गाडी अडवून त्यांना सुमारे अर्धातास घेराव घातला.

वनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !

Last Updated: Monday, November 7, 2011, 08:54

राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.