पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:31

कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

धरणं भरलेली; तरीही पुण्याला एकवेळ पाणी…

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 20:37

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.

मुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:50

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

Last Updated: Saturday, March 23, 2013, 21:36

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:26

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.

धरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:09

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.

नाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 19:08

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु लागलेत. प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाही.

पाणीसाठी संपला, मुंबईत होणार बोंबाबोंब

Last Updated: Monday, July 16, 2012, 11:25

समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीचे नियोजन कोलमडले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. पावसाची कृपा न झाल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण पाणी कपातीचे धोरण अवलंबण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

पुणेकरांच्या 'पाण्याचं काही खरं नाही'....

Last Updated: Friday, July 6, 2012, 10:11

पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.

मुंबईत आजपासून पाणी कपात

Last Updated: Sunday, July 1, 2012, 12:43

मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांत फक्त ५३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एक जुलैपासून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...

Last Updated: Monday, May 7, 2012, 10:39

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीकपात

Last Updated: Friday, May 4, 2012, 11:42

मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण

Last Updated: Saturday, March 31, 2012, 17:46

नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?

Last Updated: Monday, March 26, 2012, 20:50

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.

नाशिकमध्ये पाणीकपातीचे संकेत

Last Updated: Friday, March 23, 2012, 18:06

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळं पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय.

पिंपरी-चिंचवडकरांवरही पाणीकपातीचे संकट

Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:55

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडवरही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे ही पाणीटंचाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप होतोय. निवडणुका संपताच राजकारण्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय.

पुण्याचं पाणी कुठे मुरलं?

Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:53

पुण्यातलं पाणी आता चांगलंच पेटायला लागलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या 9 TMC पाण्याचा हिशोबच लागत नाहीय. पुण्याचं पाणी नक्की गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

पुण्यात बिल्डर तुपाशी सर्वसामान्य मात्र उपाशी

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 21:07

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात काय ती फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठीच...

मुंबईत २५% पाणी कपात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 09:49

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

मुंबईत ५० % पाणी कपात

Last Updated: Thursday, November 17, 2011, 07:34

मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.