21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:08

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती

मंत्रालयाची भीषण आग नियंत्रणात

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:54

मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:55

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्याला लागली आहे. याआधी चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी मंत्र्यालयाला २.४० मिनिटांनी लागही आग होती.

सरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे

Last Updated: Monday, July 9, 2012, 22:05

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

पावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने

Last Updated: Monday, July 9, 2012, 13:34

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 16:04

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

सीबीआयला सुगावा लागणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.

‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’

Last Updated: Saturday, June 23, 2012, 08:15

मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.

पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका

Last Updated: Saturday, June 23, 2012, 07:46

मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

Last Updated: Friday, June 22, 2012, 14:36

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.

अजित पवारांचं बोट मुख्यमंत्र्यांकडे!

Last Updated: Friday, June 22, 2012, 10:37

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.