Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:09
मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.