Last Updated: Tuesday, October 22, 2013, 10:43
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.