मनसे आंदोलकांवर लाठीचार्ज, ४८ जणांना अटक

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 16:45

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडियन ऑक्झिलेट कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. कंपनीवर धडक मारून गेट बंद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या ४८ कार्यकर्त्यांना अटक केली. तर ५० जणांवर गुन्हे दाखल केले. कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

Last Updated: Saturday, August 3, 2013, 22:21

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

विदर्भ-कोकणात पूर परिस्थिती

Last Updated: Friday, August 2, 2013, 20:57

चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.

ठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:32

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.

माळशेज घाटातील वाहतूक बंदच

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:36

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:04

रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.

कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

Last Updated: Thursday, August 1, 2013, 12:33

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. बांद्रा-मडगाव-बांद्रा आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद या दोन गाड्या दि. २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील.

माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:02

कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.

सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 20:15

नवी मुंबईत सोनसाखळी चोरांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झालाय.

गणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 14:01

कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.