राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 13:46

राज्यात चेन स्नॅच‌िंगच्या घटना खूप मोठ्या संख्येनं घडतांना दिसतायेत. नागपूरातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढलाय. या चोरांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर सेलिब्रेटींच्या नातेवाईकांनाही बसतोय. द वॉल राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही हा फटका बसलाय.

ठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:28

राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 21:19

रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असले, तरीही नागपुरात मात्र मोठ्या प्रमाणात याचे उल्लंघन होण्याचे प्रकार होत आहेत.

महाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली

महाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:47

महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:25

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

आनंद यादव यांची वादग्रस्त पुस्तके नष्ट करण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 13:59

ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक आनंद यादव यांची ती वादग्रस्त पुस्तके नष्ट कऱण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या दोन्ही पुस्तकांच्या प्रती नष्ट करण्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 12:06

ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.

शरद पवार जातीय राजकारण करतात- विनोद तावडे

शरद पवार जातीय राजकारण करतात- विनोद तावडे

Last Updated: Monday, June 9, 2014, 21:24

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.

अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर

अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर

Last Updated: Monday, June 9, 2014, 13:38

काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.