Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:28
राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.