बिहार दिवसावर वाद हा 'बिनपैशाचा तमाशा'!

Last Updated: Friday, April 13, 2012, 21:14

बिहार दिनावरुन मनसे आणि नितीश कुमार यांच्यात अखेर समेट झाली. पण, यावर शिवसेनेने आपल्या खास शैलीत टीका केली आहे. बिहार दिनावर आधी वाद आणि नंतर समेट हे तर फिक्सिंग होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राज ठाकरेंचा बिहार दिनाला 'ग्रीन सिग्नल'

Last Updated: Friday, April 13, 2012, 16:24

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला हिरवा कंदील दाखवला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.

बिहार दिनाचा तिढा सुटणार? आयोजक राज भेटीला

Last Updated: Saturday, April 14, 2012, 08:30

बिहार दिनाचे बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.

बिहार दिनाला मी मुंबईत जाणारच - नीतिश

Last Updated: Friday, April 13, 2012, 14:29

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना बिहार दिनाचे मला निमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने मुंबईत जाणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वाद नीतिश कुमार यांनीच निर्माण केला आ

बिहार दिन : राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर बैठक

Last Updated: Friday, April 13, 2012, 13:00

मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत 15 एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:00

राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

बिहार दिन साजरा करून दाखवाच - राज

Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:43

बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?

बिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव

Last Updated: Thursday, April 12, 2012, 17:31

मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

मुंबईत होणार 'बिहार दिन' - नीतिशकुमार

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 09:05

१५ एप्रिल रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बिहार दिन' कार्यक्रमाला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दंड आता नव्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी थोपटले आहेत. त्यामुळे ज्याला काही सन साजरे किंवा दिन साजरे करायचे आहेत, ते त्यांनी आपल्या राज्यात साजरे करावेत, महाराष्ट्रात येऊन त्याचे राजकारण करू नये, गाठ माझ्याशी आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी दिले होते. त्यामुळे कडवा विरोध दर्शविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नीतिशकुमार यांनी खुले आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.