बंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली

Last Updated: Monday, January 20, 2014, 18:44

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Saturday, January 11, 2014, 18:15

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 10:23

सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.

अखेरच्या रणजी मॅचमध्ये सचिन ५ रन्सवर आऊट!

Last Updated: Sunday, October 27, 2013, 16:05

हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.

रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:02

ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:06

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

Last Updated: Monday, January 7, 2013, 06:52

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.

'रणजी' ट्रॉफीवर राजस्थानचा कब्जा

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 08:48

राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.

अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 14:40

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.