राज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 10:45

महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.

नॅनोचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Last Updated: Thursday, June 27, 2013, 10:22

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण नॅनोसाठी तंतोतंत लागू पडते. संपूर्ण देशाची सफर करुन जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा विक्रम नॅनोने केला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेय.

टाटा समूहाची आजपासून सायरस मिस्त्रींकडे धुरा

Last Updated: Monday, December 31, 2012, 11:19

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.

रतन टाटा निवृत्त होणार, मिस्त्री पदभार स्वीकारणार

Last Updated: Friday, December 28, 2012, 15:00

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत.

टाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात

Last Updated: Thursday, December 27, 2012, 16:36

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.

रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे

Last Updated: Sunday, December 30, 2012, 07:06

उद्योगपती रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे आदी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पदभार रतन टाटांच्या विश्वासातील सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आलाय.

२८ डिसेंबरला सायरस स्वीकारणार `टाटा सन्स`च्या अध्यक्षपदाची सूत्रं

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 07:57

टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा भार सोपवलाय. मंगळवारी ही घोषणा केली गेलीय.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- रतन टाटा

Last Updated: Thursday, January 5, 2012, 18:41

सरकारच्या निर्णय घेण्याच्या कूर्मगती बाबतीत देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी रतन टाटांनी मात्र वेगळं मत प्रदर्शित केलं आहे. भारताची अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने जगभरात आर्थिक आरिष्ट्याने थैमान घातलं असलं तरी निराश होण्याचं काहीच कारण नाही असं मत रतन टाटांनी व्यक्त केलं आहे.ृ

सायरस मिस्त्री रतन टाटांचे वारसदार

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:31

रतन टाटांनी अवघ्या ४३ वर्षांच्या सायरस मिस्त्रींची निवड आपला वारसदार म्हणून केली आहे. सायरस मिस्त्रींची टाटा सन्सच्या डेप्युटी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री रतन टाटांसमवेत एक वर्ष काम करणार आहेत. रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये टाटा सन्सची धुरा सांभाळतील. टाटा सन्स ही टाटा साम्राज्यातल्या सर्व कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सचा अध्यक्ष हा टाटा साम्राज्याचा अधिपती असतो.