राज्यातील कॉलेजेस् ‘यूजीसी’ निधीला मुकणार...

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 10:44

राज्यातल्या जवळपास सर्वच महाविद्यालयांना ‘यूजीसी’च्या निधीला मुकावं लागणार आहे. जोपर्यंत कनिष्ठ महाविद्यालये उच्च महाविद्यालयांपासून अलिप्त ठेवत नाहीत तोपर्यंत निधी मिळणार नसल्याचे निर्देश यूजीसीनं दिले आहेत. त्यामुळं महाविद्यालयांना वर्षाला दीड कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

पुण्यात नव्या अमली पदार्थाची नशा!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 20:07

दारू, भांग, चरस-गांजा हे नशेचे पदार्थ सगळ्यांना माहीत आहेत. पुण्यात मात्र या सगळ्याहून वेगळा पदार्थ नशेसाठी वापरला जातोय. `मॅजिक मश्रूम` असं या पदार्थाचं नाव आहे...

कॉलेजांमध्ये बसवणार मोबाईल जॅमर!

Last Updated: Monday, July 8, 2013, 17:21

राज्य सरकार सध्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या विचारात आहे. मात्र, याला विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विरोध होत असल्याचंच दिसतय.

३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

Last Updated: Friday, January 18, 2013, 22:43

भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.

‘बोगस महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक’

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 22:57

राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत.

अनधिकृत महाविद्यालयांवर होणार कारवाई

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 19:22

राज्यातल्या अनधिकृत डीएड आणि बीएड महाविद्यालयांविरोधात कारवाई होणार आहे. अनधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीतही प्राध्यान मिळणार नाही, असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.

अभियांत्रिकीच्या ‘दुकाना’त ग्राहकच नाही

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:05

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.

फीचे जड झाले ओझे...

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:00

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या फीमध्ये झालेल्या वाढीने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.