ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

Last Updated: Friday, June 13, 2014, 15:09

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.

ठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:45

ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 21:19

रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असले, तरीही नागपुरात मात्र मोठ्या प्रमाणात याचे उल्लंघन होण्याचे प्रकार होत आहेत.

महाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत

Last Updated: Sunday, May 18, 2014, 23:09

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

आयपीएल : चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्सला दिलासा

Last Updated: Friday, March 28, 2014, 13:39

सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:08

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

शिवसेनाप्रमुखांच्या `शक्तीस्थळा`ला मान्यता!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:13

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीस्थळाला मान्यता देण्यात आलीय. हेरिटेज कमिटीनं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. शिवाजी पार्कवरच्या जागेच्या वादावर त्यामुळे पडदा पडलाय.

`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 09:43

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.

मेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच

Last Updated: Thursday, May 2, 2013, 10:45

महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.

सिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:35

मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

चिमणीतून काळा धूर, अजूनही पोपची निवड नाहीच

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 12:55

आगामी पोप कोण असणार हे भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीपर्यंत ठरू शकलेलं नाही. बेनेडिक्ट १६वे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील पोप कोण असणार याबाबत निवडणुक प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 21:36

औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.

सिग्नल यंत्रणेत बिघाड... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Friday, December 14, 2012, 17:36

मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.

ट्रान्स हार्बर लिंकला हिरवा झेंडा; मुंबईची नवी ओळख

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 13:06

देशातला दुसरा समुद्र मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)साठी सरकारकडून हिरवा झेंडा मिळालाय. या योजनेचा काम जानेवारी २०१३ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:35

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

१७ फेब्रुवारीला मतमोजणीचे संकेत

Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:07

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणुक आयुक्त निला सत्यनारायण यांनी तसे संकेत दिलेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.