Last Updated: Wednesday, May 23, 2012, 09:19
दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटला वरदायिनी ठरणारी एकरुख उपसा सिंचन योजना गेल्या 18 वर्षांपासून रखडली आहे. अपुरा निधी आणि राजकीय उदासिनता ही यामागची मुख्य कारणं आहेत. 87 कोटींच्या योजनेचा खर्च आता 168 कोटींवर जाऊन पोहचलाय. तब्बल 46 गावांतील ग्रामस्थांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत.