अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

Last Updated: Friday, February 14, 2014, 15:36

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:23

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.

व्यापारी संकुलासाठी शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 19:06

उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.

माधुरीला 'थिरकण्यासाठी' मुंबईत हवा 'भूखंड'

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:59

एक, दो, तीन, म्हणत ज्या माधुरीने आपल्या डान्सच्या जोरावर साऱ्यांनाच थिरकायाला भाग पाडलं. त्यामुळे साऱ्यांचाच मनावर माधुरीच्या डान्सची 'मोहिनी' होती. माधुरी आणि डान्स याचं नातं फार जवळचं आहे.

प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 17:22

बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.

यवतमाळमधील भूखंड घोटाळा उघड

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 19:36

यवतमाळ जिल्हयातल्या बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं 2 कोटी 82 लाख रूपये खर्च करून 56 एकर जमीन घेतली. मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झालाय. एका आरटीआय कार्यकर्त्यानं हा घोटाळा उघडकीस आणलाय.

भूमाफियांनी चिखलीत आरक्षित जागा विकली

Last Updated: Sunday, April 22, 2012, 16:31

बुलढाणा जिल्ह्यतील चिखलीमध्ये भूखंड माफियांनी आरक्षित भूखंड विकून करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आलाय.

पिंपरी चिंचवडमध्ये बिल्डरांची चांदी!

Last Updated: Sunday, April 22, 2012, 14:05

पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय. बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

आरक्षित भूखंडावर 'कृपां'चा साईप्रसाद इमला

Last Updated: Friday, March 30, 2012, 08:44

कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.