नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated: Monday, September 16, 2013, 10:54

अकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.

लाईफलाईनला पर्याय काय?

Last Updated: Thursday, April 19, 2012, 23:59

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 09:35

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 09:36

मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर रात्र काढावी लागली. दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.