मोदी, केजरीवाल, लालू यांच्याशी फेसबुक लाईव्ह संवाद

Last Updated: Thursday, February 20, 2014, 23:09

आता राजकीय नेत्यांशी तुम्ही लाईव्ह संवाद साधू शकता. यासाठी फेसबुकने तशी व्यवस्था केली आहे. सोशल नेटवर्कींगमधील आघाडीच्या फेसबुकने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजवरून कोणीही फेसबुक वापरकर्ता नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी लाईव्ह संवाद साधू शकणार आहे.

मैदानाबाहेरही सचिन ठोकतोय रेकॉर्डवर रेकॉर्ड!

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:57

सचिन तेंडूलकरची जादू जरी आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नसली तरी चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच सचिननं रिटायर्ड झाल्यावरही आणखी एक रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड आहे सचिनच्या स्टँप विक्रीचा....

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:45

लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:46

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

मतदार यादीत `किन्नर` समाजाचं अस्तित्त्व!

Last Updated: Thursday, February 20, 2014, 18:21

किन्नर समाजाला आता त्यांची स्वतःची ओळख मिळाली आहे. मतदार यादीमध्ये प्रथमच स्त्री किंवा पुरुष नाही तर ` किन्नर` या नावाने त्यांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. यामुळे किन्नर समाजात आनंदाचे वातावरण पसरलंय.

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज

Last Updated: Thursday, February 20, 2014, 17:19

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.

पीएफ धारकांना खूशखबर..मिळणार जास्त व्याज

पीएफ धारकांना खूशखबर..मिळणार जास्त व्याज

Last Updated: Thursday, February 20, 2014, 15:29

पीएफ धारकांना चांगला परतावा मिळणार आहे. कारण पीएफवर ८.७५ टक्के व्याज देण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय चालू वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ धारकांना भविष्य निर्वाह निधीचे चांगले पैसे मिळणार आहेत.

सूफी गायक हंसराज यांनी स्वीकारला इस्लाम?

Last Updated: Thursday, February 20, 2014, 15:13

मूळ पंजाबचे सूफी गायक, पद्मश्रीप्राप्त हंसराज हंस यांनी पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारलाय, अशा आशयाच्या बातम्यांनी सध्या पाकिस्तानातील मीडियात जोर पकडलाय.

 अरे हे काय पंतप्रधान संतापले

अरे हे काय पंतप्रधान संतापले

Last Updated: Thursday, February 20, 2014, 13:43

तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.

राजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती

राजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती

Last Updated: Thursday, February 20, 2014, 13:29

राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.