अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

LIVE -निकाल हिंगोली

Last Updated: Friday, May 16, 2014, 22:23

प्रोफाईल मतदारसंघाचं : हिंगोली

दरोडेखोरांचा पोलिसांवर कुऱ्हाडी-कोयत्यानं हल्ला

Last Updated: Saturday, June 23, 2012, 13:29

हिंगोलीत पोलीस निरीक्षकाच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड गंभीर जखमी झालेत.

संत नामदेवांच्या पालखीचे नरसीतून प्रस्थान

Last Updated: Friday, June 8, 2012, 18:02

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा तथा पायीदिंडी आज नामदेवाचे जन्म स्थान असलेल्या नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्याची सांगता ३ जुलै रोजी होणार आहे.

विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

Last Updated: Monday, May 7, 2012, 20:41

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

शिवाजी माने राष्ट्रवादीत, पिचडांचा फुसकाबार

Last Updated: Saturday, January 28, 2012, 16:05

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवाजी माने यांनी उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अधिकृत प्रवेश केला. शिवाजी माने हे काँग्रेस हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान, एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी काल सांगलीत केला होता. मात्र, ते माजी खासदार असल्याने त्यांचा बार फुसका निघाल्याची चर्चा आहे.

हिंगोली पालिका निवडणूक जाहीर, आचारसंहिता सुरू

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 05:52

हिंगोली, कळमनुरी व वसमतनगर पालिकेच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. आलेल्या अर्जांची २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येणार आहे.

अजित पवारांचा सवाल, बंदूक तरी उचलता येते का?

Last Updated: Sunday, October 9, 2011, 10:36

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावरुन सुरू झालेला ठाकरे विरुद्ध पवार हा वाद, संपता संपत नाहीए. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा बाळासाहेबांना ‘टार्गेट’ केलं आहे त्यामुळे हा वाद ‘टारगट’ पातळीवर उतरल्याचे दिसून येते. तर उद्धव यांनी पवार यांच्यावर पलटवार केला आहे.