Last Updated: Friday, November 18, 2011, 13:04
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारींची भीतीने गाळण उडाली होती. त्यामुळेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दोषींना भारताच्या हवाली करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. यात हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनाही भारताच्या सुपूर्द करण्याची त्यांची तयारी होती. तसंच अमेरिकेला अनुकूल असलेली नवी सुरक्षा टीम स्थापण्यास झरदारी तयार होते.