आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 19:37

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:13

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

'कोंडाण्या'बरोबर नागरिकही राहिले कोरडेच!

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:34

प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर कोंडाणे धरण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय पण, त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत.

कोंडाणे धरणाच्या कामावर हायकोर्टाचे ताशेरे

Last Updated: Saturday, May 12, 2012, 22:38

कोंडाणे धरणाच्या कामाबाबत उच्च न्यायालयानं सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारी खातं आणि ठेकेदारांमधील साटंलोटं यामुळे धरणाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी वाढलाय. कोर्टानं सध्या कामाला स्थगिती दिलीय आणि पाच आठवड्यात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत.

पाण्यासाठी पायपीट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 21:31

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 19:24

महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय.

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 21:18

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

Last Updated: Friday, May 4, 2012, 19:17

“मी दुष्काळी भागाचा दौरा करतोय, मंत्र्यांच्या परदेश दौ-यासारख्या फालतू विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही”, असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांना लगावलाय.

दुष्काळाचं राजकारण

Last Updated: Thursday, May 3, 2012, 23:42

महाराष्ट्रातील आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896 - 1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे...त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता..1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं...

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 17:58

सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगाव बनलंय 'निर्जळगाव'!

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:41

दुष्काळाच्या झळा पश्चिम महाराष्ट्राच नाहीतर इतर भागांनाही बसतायत. जळगावात पारा ४5 अंशांवर गेलाय. जलस्त्रोत कोरडे पडू लागल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

Last Updated: Friday, April 27, 2012, 16:49

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

दुष्काळामुळे साताऱ्यात भीषण परिस्थिती

Last Updated: Sunday, April 22, 2012, 22:50

दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांची राज्यपालांना भेट

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:02

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांनी आज राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळाची स्थिती, पाण्याचा अभाव, जनावरांच्या चा-याचा प्रश्न याची माहिती दिली.

सांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 22:29

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.

पुण्यातही दुष्काळ, पाण्यासाठी लोकांचे हाल

Last Updated: Thursday, April 12, 2012, 08:24

प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाईचं वास्तव भीषण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असून लाखो लोक पाण्यासाठी तहानलेले आहेत. हा दुष्काळ नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर वाद झडू शकतो.

दुष्काळी भागात, सवलतींची बरसात

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:11

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव

Last Updated: Friday, April 6, 2012, 13:58

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.