दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:45

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

दुष्काळ हा मानवनिर्मितच....

Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:55

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही.

महाराष्ट्रासाठी कोणीही एकत्र येत नाही- पवार

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 11:49

दुष्काळाच्या मुद्यावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्राने केली सरकारची घोर निराशा..

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 16:06

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.

दुष्काळावर राजकारण नको- आबा

Last Updated: Monday, May 7, 2012, 09:55

ज्यावर दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती आली असताना साऱ्यांनी हातात हात घालून सामोर जाणं गरजेचं असतं. मात्र दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.

मुबलक पाणी असूनही धुळ्यात टंचाई

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:55

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे.. मात्र मुबलक पाणी असतानाही काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असेल तर.. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे तीन वर्षांपासून हे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

यंदा महाराष्ट्राला 'दुष्काळात तेरावा महिना'...

Last Updated: Saturday, April 21, 2012, 18:57

यंदा राज्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवमान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यात एल-निनो हा घटक सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. त्याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता व्यक्त होती आहे.

रायगडात पाण्याचा दुष्काळ

Last Updated: Friday, April 13, 2012, 09:55

दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.

दुष्काळाचं दुष्टचक्र !

Last Updated: Friday, April 6, 2012, 23:39

महाराष्ट्राच्या कुणा एका बळीराजाची व्यथा ही केवळ त्याचीच नाही तर महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा सोस सोसणा-या असंख्य बळीराजाची आहे. अवघ्या काही महिन्यापुर्वी आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचे नेते, शेतक-याचे पुत्र आहोत असं सांगत जोरदार भाषणबाजी करणा-या सा-यानीच आज या बळीराजाला एकटं पाडलय.. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुष्काळांन होरपळणा-या या सर्वसामान्यांना अस्मानीच नाही तर सुल्तानी संकटाला सामोरं जावं लागतय.. ज्यांच्याकडून थेट दिलासा मिळण्याची अपेक्षा त्या कृषीमंत्र्यानी दिलासादायक अस काहीच न सांगता धक्कादायक विधान करत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यावरच दुष्काळाच खापर फोडलं..