ऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 23:32

ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 15:38

उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

Last Updated: Friday, November 16, 2012, 13:35

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री

Last Updated: Thursday, November 15, 2012, 20:37

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.

`स्वाभिमानी`नं रोखल्या शिवसैनिकांच्या गाड्या

Last Updated: Thursday, November 15, 2012, 19:19

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.

आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी

Last Updated: Thursday, November 15, 2012, 21:45

सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.

पेटवा पेटवी

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:13

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:29

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 12:34

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:10

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.

`बंद`च्या भूमिकेवर सेनेचा यू-टर्न

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 20:19

ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.

सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:04

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

राज ठाकरेही उसाच्या फडात

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 12:33

आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.

ऊसाचे झालं राजकीय चिपाड

Last Updated: Monday, November 7, 2011, 04:23

शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.

कोल्हापूर अशांत जिल्हा, जमावबंदी लागू

Last Updated: Saturday, November 5, 2011, 07:44

कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.