Last Updated: Monday, July 22, 2013, 17:11
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे.