विजय पांढरेंची राजकीय इनिंग सुरू

Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:04

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांनी निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. राजकारणाच्या आखाड्यात उतरणाऱ्या पांढरे यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पांढरे उत्सुक आहेत.

सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!

Last Updated: Saturday, November 23, 2013, 10:25

सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..

सातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?

Last Updated: Saturday, November 9, 2013, 12:14

नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.

चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 16:10

जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

मला फुकटचा पगार नको, अधिकाऱ्याचा राजीनामा

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 16:28

जलसंपदा विभागाच्या गैरकारभाराचा मोठा फटका राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना बसणार आहे. केंद्रीय जल आयोगामध्ये राज्याचा एकमेव प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱ्यांने ३० जूनला राजीनामा दिलाय. कृष्णानंद भट, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

'अजित पवार लाचखोर मंत्री'

Last Updated: Friday, April 19, 2013, 16:47

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनं आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय.

जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर पांढरेंचे ताशेरे

Last Updated: Monday, October 8, 2012, 18:52

जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.

जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!

Last Updated: Monday, October 8, 2012, 07:01

सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.

नेमके काय आरोप झालेत दादांवर...

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 17:34

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय... पण त्यांनी हा राजीनामा का दिला? काय झाले होते त्यांच्यावर आरोप... कुणी केले होते हे आरोप... टाकुयात, या सर्व मुद्द्यांवर एक नजर...

दादांची ‘झटपट’ कार्यपद्धती अंगलट!

Last Updated: Monday, September 24, 2012, 23:02

जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केलीय.

पांढरेंनी आणले खात्यातले घोटाळे चव्हाट्यावर

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:05

जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडल्यानं अभियंत्यांचा रोष ओढवून घेतलाय. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केलाय. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यानीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली

जलसंपदा विभागात २० हजार कोटींची `गोलमाल`

Last Updated: Sunday, September 23, 2012, 13:49

जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.

जलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा!

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 14:47

विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आलेत. तटकरे यांच्या दोन मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचं उघड झालंय.

मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीला 'टार्गेट'

Last Updated: Friday, May 4, 2012, 16:15

गेल्या दहा वर्षांत राज्यात सिंचन क्षमता केवळ 0.1 टक्के इतकीच वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलं.