Last Updated: Monday, April 8, 2013, 19:12
बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.
Last Updated: Monday, April 8, 2013, 17:11
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. विरोधकांनी आक्रमक होत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. माफी नको राजीनामाच हवा अशी ठाम भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळं विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
Last Updated: Friday, March 1, 2013, 15:19
भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 13:00
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 11:12
अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 10:20
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 10:03
मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
Last Updated: Wednesday, February 27, 2013, 08:49
अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय...
Last Updated: Friday, August 17, 2012, 16:44
ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.
Last Updated: Thursday, May 31, 2012, 14:57
देशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...
Last Updated: Thursday, May 24, 2012, 12:57
पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता... मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...
आणखी >>