रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
इंजिनिअर ते नोकरशाह आणि नोकरशाह ते सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते राजकारणी बनलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेत आणून राजकीय विचारधारा बदलली.
लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
ठाण्यात सेनेले सत्तास्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आता त्यांचे भाऊ आणखी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सरसावले आहेत.
ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असला. आणि महापौरपद शिवसेनेला मिळाले असले तरी या सगळ्यात खरे किंगमेकर ठरले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे.
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.
ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक काळात अपहरणासारख्या घटना होत असतात. पण त्याकरिता संपूर्ण शहराला वेठीस धरु नये अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या आपले पत्ते ओपन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्य दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणूकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना भाजपनं व्हीप बजावला. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला.
ठाण्याच्या भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे या आघाडीच्या गोटात सामिल झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युतीचे ८० टक्के नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळं संशयाला बळ मिळालं आहे.
नागपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसे भाजपला मतदान करणार आहे. नागपूर महापालिकेत मनसेचे दोन नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातला फरार गुंड आणि काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक राजा गवारी आज नवी मुंबईतल्या कोकण भवनात चक्क पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांच्यासोबत दिसला.
नाशिकमध्ये शिवसेनेची झालेली पिछेहाट यामुळे नाशिक जिल्हा आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या संदर्भातील निर्णय आज शिवसेनाभवनात घेण्यात आला. तसेच नाशिकचे महापौरपद हे भाजपसाठी सोडण्यात आल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे.
नाशिकच्या सत्ता समीकरणात दिवसेंदिवस नवी रंगत येते आहे. मुंबईत महापौरपदाची मागणी करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी थेट नाशिकच्या महापौरपदाची ऑफर देऊन नवा गुगली टाकली आहे.
आम चुनाव 2014