नाशिकमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असा दावा भाजपनं केला आहे. त्याचबरोबर भाजपनं मुंबईच्या महापौरपदावरचा दावाही कायम ठेवला आहे. महायुतीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर भाजपनं हा दावा केला आहे.
मुंबईत भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. मुंबईतल्या महापौरपदावर भाजपनं दावा केला आहे. एक टर्म तरी महापौरपद हवेच अशी आग्रही मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं
नाशिकमध्ये मनसे सत्तेसाठी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मात्र काल भाजप नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेूबांची भेट घेतली.
नाशिकमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
‘सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत. सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो.
नाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो.
शिवसेना नेते मनोहर जोशींनी दादरमधील पराभवाची जबाबदारी झटकलीय. दादरमधील पराभावाला आपण व्यक्तीश: जबाबदार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. याबाबत ते 'झी २४ तास'शी बोलत होते.
मनसे आमदार बाळा नांदगावकर विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सल्लागार समिती बैठकीला नांदगावकर गैरहजर राहिल्याने याला आता दुजोरा मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीत दादर-माहिममध्ये शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तिथली जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी उद्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांना पोलिसांनी अटक केलीय. बागवे हे उमेदवार होते तसंच त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.त्याच्याविरोधात खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज अविनाश बागवेंसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे १०६ नगरसेवक निवडून आल्यान महायुतीचाच महापौर होणार, हे स्पष्ट आहे. या महापौर पदाच्या शर्यतीत चार टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत. तर स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल शेवाळे विराजमान होण्याची शक्यता आहे.
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत एकमेकांची उणीदुणी काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता शहाणपण सुचलंय.... महापालिका आणि झेडपीच्या सत्तेसाठी ठिकठिकाणी काँग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी राष्ट्रवादीनं केलीय...
महापालिका निवडणुक संपून काही तास उलटत नाही तोवर नागपूरात राडा सुरू झाला. नागपुरात महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजीत राडा सुरु झाला आहे. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवाची काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना दिल्लीचं बोलावणं आलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये आपल्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वपूर्ण खुलासे देखील केले. 'नाशिकचा महापौर हा मनसेचाच असणार'. असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधा-यांना झटका बसलाय. तर काही ठिकाणी अनपेक्षित यश मिळालंय. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. तर सांगलीत पतंगराव कदमांबरोबरच्या लढतीत जयंत पाटलांनी बाजी मारली आहे. तर कोकणात ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्यातरी येथे त्रिशुंकू परिस्थिती आहे. रायगजमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली तरी सत्ता शेकाप-सेना-भाजप-आरपीआय महायुतीची असणार आहे.
नाशिकमध्ये सत्तेसाठी नवी समीकरणे पाहायला मिळणार आहे. मनसे आणि भाजपची युतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महापौर मनसेचा, उपमहापौर भाजपचा होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष नेतेमंडळीनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगून चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात भिरकावला आहे.
मुंबई महापालिकेवर सलग चौथ्यांदा भगवा फडकावल्याने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
प्रसिध्द ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचे मुंबईतील मतदान यादीतून नाव गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर ठाण्यात पूर्वी राहणारी मात्र, लग्नानंतर मुंबईकर झालेली अभिनेत्री कविता लाड-मेढेकर हिला मतदानापासून रोखण्यात आले.
नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावरच का, घरगुती वाद उकरले जातात. पण मी एक सांगतो, बाळासाहेबांसाठी मी १०० पावलं पुढं येईन. यावर ठाम आहे. 'करून दाखवलं' ही राजकीय टीका आहे. राजकीय टीका केलेली असताना घरगुती वाद का उकरून काढले जात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्वबाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.
आम चुनाव 2014