तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:14

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

लातूरमध्ये हॉटेलियरचा गूढ मृत्यू

Last Updated: Monday, December 5, 2011, 03:55

लातूरमध्ये हॉटेल व्यावसायिक विजय मणियार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याची शंका वर्तवण्यात येतेय.

शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात

Last Updated: Friday, November 25, 2011, 10:11

यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला.

पुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53

धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 03:12

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

शेतकऱ्यांचं आत्महत्त्या सत्र सुरूच

Last Updated: Friday, November 11, 2011, 13:38

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या ७२ तासांमध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार

Last Updated: Thursday, November 10, 2011, 06:26

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.

विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:28

आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.