Last Updated: Friday, October 11, 2013, 10:32
राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.