पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:05

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

मनमाडमध्ये ‘पाणी’बाणी! कडकडीत बंद

Last Updated: Thursday, February 14, 2013, 12:28

मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.

सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:26

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

Last Updated: Sunday, February 10, 2013, 18:45

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:03

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:15

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

धरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:09

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.

नाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 19:08

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु लागलेत. प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाही.

अत्यल्प पाण्यात कॅलीफ्लॉवरचं पीक

Last Updated: Monday, September 24, 2012, 09:25

दुष्काळात अनेक शेतक-यांचं नुकसान झालं असलं तरी काही शेतक-यांनी मात्र अत्यल्प पाण्यात चांगलं उत्पादन घेतलंय अशा शेतक-यांपैकी औरंगाबदच्या ज्ञानेश्व काकडे य़ांनी फुलकोबीचं उत्पादन घेऊन शेतक-यांपुढे आपला आदर्श ठवेलाय.

औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचं संकट

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 08:16

औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:43

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

Last Updated: Sunday, June 10, 2012, 11:58

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

Last Updated: Friday, April 27, 2012, 16:49

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

ठाणे ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:09

मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?

Last Updated: Monday, March 26, 2012, 20:50

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.