Last Updated: Wednesday, February 15, 2012, 20:16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्वबाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.