कॅम्पाकोलावर कारवाई अटळ, कायदा मोडणार नाही-मुख्यमंत्री

Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:33

कॅम्पाकोलासाठी कायदा मोडणार नाही, ठरल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई नको - नांदगांवकर

Last Updated: Sunday, June 22, 2014, 16:21

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई करु नका, या मागणीसाठी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:00

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

रहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:33

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेची नव्याने नोटीस

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:39

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने नव्याने नोटीस पाठवली आहे. १२ जूनला संध्याकाळपर्यंत चाव्या ताब्यात देण्याबाबत या नोटीशीत म्हटलंय.

लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट

Last Updated: Monday, June 9, 2014, 20:03

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.

`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...

Last Updated: Thursday, June 5, 2014, 11:31

सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली

Last Updated: Monday, May 5, 2014, 15:15

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे रहिवाशांना 31 मे पर्यंत राहण्याचा दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबई महापालिकेचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कॅम्पा कोलावासियांसाठी आशेचा किरण

Last Updated: Friday, December 20, 2013, 23:31

मुंबईतल्या कॅम्पा कोला वासियांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालाय.या प्रकरणाचे फेरनिरिक्षण करून FSI नियमित करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.

`कॅम्पा कोला`ला झटका... घरं खाली करावीच लागणार

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 20:05

वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिलाय. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत.

‘कॅम्पाकोला’चे अनधिकृत मजले आज पडणार नाहीत

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:21

सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, आज ‘कॅम्पाकोला’च्या अनधिकृत मजल्यांवर मुंबई मुंबई महापालिकेचा हातोडा पडतोय.

कॅम्पाकोलावर हातोडा पडणार? काय होणार रहिवाशांचं?

Last Updated: Monday, November 11, 2013, 22:19

कॅम्पाकोला बिल्डींग पाडण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणी हस्तक्षेपास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. अॅडव्होकेट जनरल यांचं यासंदर्भातलं मत प्रतिकूल आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेपास नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळं कॅम्पाकोलाच्या आशा हळुहळू मावळत चालल्याचं चित्र आहे.

‘कॅम्पाकोला’च्या रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Last Updated: Saturday, November 9, 2013, 09:31

वरळीतल्या कॅम्पाकोला रहिवाशांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कॅम्पाकोला बिल्डिंगवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. याआधी शेवटचे प्रयत्न म्हणून रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.

कॅम्पाकोलाचं उपोषणास्त्र : उपोषणाचा पाचवा दिवस

Last Updated: Friday, November 8, 2013, 13:10

वरळीच्या कँपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

कॅम्पाकोलावर पाच महिन्यांनी पडणार हातोडा

Last Updated: Thursday, May 2, 2013, 22:45

मुंबईत दिवसभर चर्चा होती ती कॅम्पाकोलाची. या कम्पाऊण्डमधल्या रहिवाशांचं काय होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. आणि पाच महिने कारवाईला स्थगिती दिली. दिवसभर हा आशा-निराशेचा खेळ सुरू होता. आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं.