Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:14
मायानगरीत टिकून राहायचे असेल तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कुठल्याही फिल्मी पार्श्वीभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये टिकून राहणे हीच खूप मोठी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. ती मुंबईत ‘क्रिश ३’ प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिने ही बाब सांगितली. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.