Last Updated: Thursday, January 2, 2014, 17:48
वणी महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. क्वालिस गाडीला ट्रकला दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
Last Updated: Tuesday, December 31, 2013, 17:36
धुळ्याच्या महापालिका निवडणुकीनंतर लोकशाहीची थट्टा पाहायला मिळालीये. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पैशांची शब्दशः उधळपट्टी केलीये... नवनिर्वाचित उपमहापौर फारुख शहा यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हा पैशांचा माज दाखवला...
Last Updated: Monday, December 30, 2013, 20:16
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
Last Updated: Sunday, December 29, 2013, 20:44
बीड जिल्ह्यातल्या गेवराईतले शिक्षक राजेंद्र घाडगेच्या हत्येप्रकरणी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेला अटक करण्यात आलीय. घाडगे यांची शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
Last Updated: Sunday, December 29, 2013, 17:22
खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.
Last Updated: Saturday, December 28, 2013, 20:58
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Last Updated: Tuesday, December 24, 2013, 19:26
पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..
Last Updated: Tuesday, December 24, 2013, 14:11
कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.
Last Updated: Wednesday, December 18, 2013, 20:05
जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.
Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:39
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
आणखी >>