राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

बदलत्या हवामानात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

Last Updated: Friday, June 20, 2014, 20:30

सध्या नवी दिल्लीत डॉक्टर त्वचेसंबंधीत असलेले त्रास आणि त्याची स्वच्छता कशी ठेवता येईल यावर लक्ष देत आहेत. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे आजार आणि रोग पसरले जातात. म्हणून या बदलत्या हवामानात डोळ्यांची काळजी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

सावधान… ‘नानौक’ चक्रिवादळ येतंय!

Last Updated: Thursday, June 12, 2014, 17:16

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अरबी सागरात मुंबईहून दक्षिण-पश्चिम भागात जवळपास 660 किलोमीटर अंतरावर निम्न दाबानं ‘नानौक’ नावाचं चक्रिवादळ निर्माण व्हायला गती मिळालीय. हे चक्रिवादळ ओमानच्या तटाकडे पुढे सरकतंय.

यंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी

Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08

यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

मुंबईत आजारांनी डोक काढलं वर

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:16

सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.

भारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट

Last Updated: Thursday, October 10, 2013, 12:04

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:45

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:07

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:00

मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:17

भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

उत्तराखंड : ...तर वाचले असते हजारोंचे प्राण!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 16:17

उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.

हेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:37

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 12:04

उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.

मान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 19:37

उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.

मुंबईच्या वातावरणात बदल... तब्येती सांभाळा

Last Updated: Monday, March 4, 2013, 07:14

मुंबईत सध्या वातावरणातील अचानक बदलामुळं अनेक मुंबईकरांचं आरोग्य बिघडलंय. विशेषत: लहान मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागलाय.

लवकरच येणार हापूस आंबा बाजारात

Last Updated: Friday, November 30, 2012, 18:37

पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

Last Updated: Friday, October 12, 2012, 08:42

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

दुबार पेरणीचं संकट; सरकारला उशीराचं शहाणपण

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:46

राज्यात दुबार पेरणीचं संकट ओढवल्यास पर्यायी व्यवस्था तयार असल्याचं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कृषी मंत्र्यानी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी राज्यात २१०० ऑटो वेदर स्टेशन्स उभारणार असल्याची घोषणा केलीय.

थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

जगाला डर्बनची हवा मानवणार का ?

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 15:10

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल शिखर परिषदेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे. जगभरातील हजारोंच्या संख्येने तज्ञ, सरकारी प्रतिनिधी, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार आहेत. या सर्वांमध्ये हवामान बदलांमुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी, कृषी उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम यासंबंधी उपाययोजने संदर्भात सहमती होते का याकडे जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे.