चालत्या रेल्वेतून पडला पैशांचा पाऊस, अन्...

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 14:20

उत्तरप्रदेशातल्या बुजुर्ग गावच्या रेल्वे ट्रॅकवर अचानक पैशांचा पाऊस सुरू झाल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गावकरी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पैसे गोळा करताना थकून गेले होते.

`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

Last Updated: Friday, May 9, 2014, 18:34

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

`नमो`चा आज लखनऊमध्ये शंखनाद...

Last Updated: Sunday, March 2, 2014, 09:37

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज लखनऊमध्ये विजय शंखनाद सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी  प्रदेश भाजपनं जय्यत तयारी केलीय.

अबू सालेमनं रेल्वेतच रचला `निकाह`?

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 11:29

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:47

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

एन.डी. तिवारींची ‘ग्रँडमस्ती’, महिलेसह डान्स जबरदस्ती

Last Updated: Monday, September 23, 2013, 17:36

वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

अखेर दुर्गाशक्तींचं निलंबन मागे

Last Updated: Monday, September 23, 2013, 00:09

उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन अखेर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतलंय. निलंबनाचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने रद्द केलाय.

यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली

Last Updated: Friday, August 9, 2013, 15:14

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.

वाळू माफियांवर कारवाई, महिला अधिकारीच निलंबित

Last Updated: Monday, July 29, 2013, 14:32

वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.

`जातीनिहाय रॅली काढाल तर याद राखा`

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:01

उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.

मुलायम भविष्य, देशात मध्यवर्ती निवडणुका

Last Updated: Saturday, March 24, 2012, 12:31

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी जी जाहीर आश्वासने दिली होती, त्याची तात्काळ अमलबजावणी करा आणि सहा महिन्यात बदल करून दाखवा, हे सांगताना लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहावे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी भविष्यवाणी केली आहे.

राहुल गांधींविरूद्ध गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 08:05

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मायावतींचा केंद्रावर हल्लाबोल

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 04:28

उत्तर प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्यावर मुख्यमंत्री मायावतींना केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्रानं राज्याला कळवण्यापूर्वीच मिडीयात रिपोर्ट लीक केल्याचा आरोप मायावतींनी केलाय़. तसंच केंद्रानं उपस्थित केलेले सवाल म्हणजे घटनेचे उल्लंघन असल्याचा आरोपही मायावतींनी केला आहे.

चप्पल फेक भोवली, नोकरी गमावली

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:25

समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रमुख सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकणा-या जितेंद्र पाठक नावाच्या तरूणाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.