Last Updated: Saturday, March 24, 2012, 08:38
महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.