१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले

Last Updated: Sunday, June 1, 2014, 21:08

संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.

सिमेंटच्या जंगलात जिवंत झाडांवर विषप्रयोग!

Last Updated: Friday, April 11, 2014, 10:29

मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवलं जातंय.

प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा

Last Updated: Friday, March 14, 2014, 18:19

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:22

काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.

‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या

Last Updated: Thursday, November 7, 2013, 12:16

२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

Last Updated: Saturday, October 26, 2013, 15:45

मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.

वसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 22:16

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.

कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

Last Updated: Saturday, August 3, 2013, 22:21

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

बेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 15:57

हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

निवासी शाळेतल्या ७३ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा

Last Updated: Monday, July 29, 2013, 09:46

बुलडाणा जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी मुलींच्या शाळेतल्या ७३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झालीय.

मुदत संपलेल्या औषधांमुळे शाळकरी मुलांना विषबाधा

Last Updated: Saturday, July 27, 2013, 22:43

डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाई दगावल्यात

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 10:33

बीडमध्ये तांदूळ खाल्यानं दहा गाईंचा मृत्यू झालाय. रस्त्यावर पडलेला युरिया खाल्ल्याने रविवारी दुपारी २७ गायींना विषबाधा झाली. त्यातील दहा गायी दगावल्या उर्वरित १७ गायींवर नारायणगडावर उपचार सुरू आहेत.

दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 08:43

दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.

आंबा की विष ?

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 23:23

गोड आंबा का बनलाय विषारी ? रसाळ आंब्यावर कुणाची पडलीय वक्रदृष्टी ? आंब्यामुळे का मिळतंय गंभीर आजारांना निमंत्रण ? बाजारात आला फळांचा राजा! सर्वत्र होतेय आंब्याची विक्री !

पाक वृत्तपत्रांची भारत विरोधी भूमिका

Last Updated: Friday, January 11, 2013, 09:30

गेल्या मंगळवारी पाक सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचे शिर कापून नेल्याच्या घटनेबद्दल जगभरातून टीका होत असताना पाक वृत्तपत्रांनी मात्र आपल्या जनतेसमोर खरी परिस्थिती मांडली नाही.

सुगंधी दूध की विष?

Last Updated: Saturday, October 13, 2012, 18:02

मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.

लतादीदींवर झाला होता विषप्रयोग!

Last Updated: Saturday, September 29, 2012, 16:04

तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:08

तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

कुटुंबाला डाकिण ठरवून विष पाजलं

Last Updated: Saturday, May 12, 2012, 16:40

नंदूरबार जिल्ह्यात एका कुटुंबाला गावक-यांनी डाकिण ठरवलं. गावात झालेल्या तीन मृत्यूसाठीही वसावे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या मुलावर विष प्रयोग करण्याचा धक्कादायक प्रकारही करण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून वेरी गावातल्या वेसावे कुटुंबाला डाकिण ठरवून अत्याचार सुरू आहेत.

वांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले

Last Updated: Monday, April 30, 2012, 09:13

मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.

पुण्यात इडलीतून २८ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:31

पुण्यात इटली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.

ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Saturday, March 17, 2012, 11:09

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रंगाची बाधा : मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा

Last Updated: Friday, March 9, 2012, 18:49

मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारखान्याच्या बाहेरुन हे विषारी रंग मुलांनी उचलले, तो नवरंग कंपाऊंडमधला रंग बनवण्याचा अवैध कारखाना मुंबई महापालिकेनं नोव्हेंबर २०११ मध्ये तोडला होता. मात्र त्यातले रंग तिथेच पडून होते. ते रंग उचलण्याची कारवाई कुणीही केली नाही. आणि हाच रंग मुलांनी उचलला आणि होळीचा बेरंग झाला.

सापाचे विष कोटींच्या घरात

Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:00

ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .