पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:05

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:03

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचं संकट

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 08:16

औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....

'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:34

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:43

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

पाणीटंचाईच्या झळा उद्योजकांनाही

Last Updated: Friday, June 29, 2012, 22:23

सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

Last Updated: Sunday, June 10, 2012, 11:58

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.

नाशिककरांवर पाणीटंचाईचं संकट...

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:07

मान्सून समोर दिसत असला तरी, नाशिककरांसमोर मात्र पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं दिसतंय. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. शहरासाठी फक्त ७५० एमसीएफटी पाणी शिल्लक असल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा केला जातोय. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शहरात पाणीकपात होतेय. त्यामुळे नाशिककरांचे डोळे लागलेत ते पावसाकडे...

पाणी संपणार... आता करायचे काय?

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 21:09

धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 21:06

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.

तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:57

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 18:13

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

इंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई

Last Updated: Sunday, April 22, 2012, 19:53

राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

विदर्भात पाण्यासाठी वणवण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:11

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

उंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या

Last Updated: Saturday, December 3, 2011, 15:13

दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.