Last Updated: Wednesday, March 28, 2012, 15:46
मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.