अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:00

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 22:04

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार

Last Updated: Sunday, April 27, 2014, 09:12

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचं निधन

Last Updated: Monday, April 7, 2014, 16:31

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:59

महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 09:59

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा…

लिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 11:50

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला

`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:55

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.

गांधीजींच्या आश्रमातही महिलेवर अत्याचार

Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05

देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.

`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 08:05

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

महात्मा गांधी `राष्ट्रपिता` नाहीत!

Last Updated: Thursday, October 25, 2012, 18:20

सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही.

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 11:39

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:04

टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.

वादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:54

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.

गांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का?

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 09:33

दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासादरम्यान भारत सरकार महात्मा गांधींशी संबंधित काही आठवणी विकत घेण्याची शक्यता आहे. लीलाव करणाऱ्या सॉथबे या संस्थेच्या मते गांधींची काही पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत.