भिवंडीत कोसळली इमारत; तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:08

भिवंडीमध्ये नारपोली परिसरात एक दोन मजली इमारत जमीनदोस्त झालीय. रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 16:10

कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.

कोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 09:03

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.

अबु सालेम हल्ला : तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात !

Last Updated: Friday, June 28, 2013, 11:47

कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करण्यात आलाय़. यात तो जखमी झालाय. त्याच्या करंगळीला गोळी चाटून गेलीय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानंत नवीमुंबईतील तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

गँगस्टर अबू सालेमवर तुरुंगात हल्ला

Last Updated: Thursday, June 27, 2013, 22:17

कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्यावर नवी मुंबईजवळ तळोजा तुरुंगात हल्ला झाला असून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.

‘लेटलतिफां’ना गुलाबपुष्पाची भेट!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 12:59

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘लेट-लतीफ’ आणि सुस्त कर्मचाऱ्यांना उपमहापौर आणि सेनेच्या गटनेत्यांनी गांधीगिरीनं चांगलाच धडा शिकवलाय.

आली हो, राजापूरची गंगा

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:07

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीचा मृत्यू

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 23:33

नवी मुंबईत दहा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. त्या मुलीचा आज मृत्यू झालाय.

कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 14:26

विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.

खेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार

Last Updated: Monday, June 24, 2013, 15:16

रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.