नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.
मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चुरशीची वाटलेली पुण्यातील लढत प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. भाजपच्या अनिल शिरोळेनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा दारूण पराभव केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करणारा विशेष रिपोर्ट
आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
बॉलिवूडचे अनेक चमचमते तारे आता लोकसभेच्या प्रांगणात अवतरलेत... एकीकडे वजनदार राजकारण्यांना मतदारांनी धूळ चारली असताना, बॉलिवूडच्या सिता-यांना मात्र सर आँखो पर उचलून घेतलंय... त्यामुळं लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा हे कायदेमंडळ आहे की बॉलिवूडचा सेट, असा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटायला नको...
देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहत झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालीय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..
गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी मिळालाय. आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. आनंदीबेन यांच्या नावाची लवकरच औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.
नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
सिंधुदुर्गात राणेंचा पराभव होईपर्यंत अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करणारे कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले हे आता लवकरच पायात चप्पल घालणार आहेत.
राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मातोश्रीवर चांगलीच लगबग होती. हा विजय साजरा करण्यासाठी मातोश्री सजली. सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशभरात जवळजवळ 60 लाख मतदारांनी मतदानयंत्रावरचं `नोटा` म्हणजेच `यापैकी कुणीही नाही` हे बटन वापरल्याचं समोर आलंय.
`राष्ट्रीय आम पार्टी` नावाचा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा आपला निर्णय साफ चुकला, हे आता आयटम गर्ल राखी सावंतलाही कळून चुकलंय... (हेही नसे थोडके!)
16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...
देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे. पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणक्यात विजय नोंदविल्यानंतर आज संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
प्रचारादरम्यान जी राहून गेली होती, ती गंगा आरती आज नरेंद्र मोदी वाराणसीत जाऊन करणार आहेत. यासाठी, ते वाराणसीत दाखल झालेत.
बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
या विजयानंतर उदयनराजेंच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही... आणि यापूर्वी अनेकदा दिसून आलेला `माज` शुक्रवारी काही औरच होता.
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आता केंद्रात नव्या सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
आम चुनाव 2014