भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.
भाजपला मिळालेल्या ऐतिहासीक विजयासाठी अमेरिकेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलय. भारतात स्थापन होणा-या नव्या लोकशाही सरकारसोबत काम करायला आवडेल असं व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ट्विटर द्वारे म्हटलंय.
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.
काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा भारताचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.
देशात पहिल्यांदा काँग्रेसशिवाय पूर्ण बहुमत जर कुणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे काँग्रेसशिवाय भाजपचं शुद्ध सरकार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
नरेंद्र मोदी नावाच्या वादळात भले मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.
काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
प्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.
पराभवाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. तसे पत्र राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.
ज्या शहरात मनसेची महापालिकेत सत्ता आहे, जे शहर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं, या नाशिक शहरात मनसेचे लोकसभेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये भरगच्च सभा घेतल्या. एका शहरात दोन-दोन सभा राज ठाकरेंनी घेतल्या,
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा देण्यासाठी ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (एसपीजी)ची एक टीम गांधीनगरला रवाना झालीय.
एनडीएने भारतात ३२५ जागांची आघाडी घेतली आहे. देशात २७५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. देशात `अब की बार मोदी सरकार` हे भाजपाचे प्रचार वाक्य सत्यात उतरणार आहे.
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये आता निकाल स्पष्ट होतोय. बॉलिवूडही या निकालाची वाट पाहतंय. कोण कोण काय म्हणाले ट्विटरवर...
आम चुनाव 2014