लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (यूपीए) सरकारवर दणकून तोंडघशी पडायची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पराजयाचं विश्लेषण केलंय.
गुजरात विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज होणार आहे. या अधिवेशनात नरेंद्र मोदी विधानसभेला संबोधित करणार असून त्यानंतर दुपारी ते आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती आहे.
मावळ लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधकामे पाडण्याविषयी केलेल्या `त्या` विधानाचा शेकापला जोरदार फटका बसला असल्याचं सांगण्यात येतंय.
निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....
मंत्रिपदासाठी लावण्यात आलेल्या लांब रांगेबाबत नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांना खडसावले आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग करून नये, अशा शब्दांत ताकीद दिली आहे.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, लालकृष्ण आडवाणीजींनी एक शब्द प्रयोग केला, मी आडवाणीजींना विनंती करू इच्छीतो, कृपया त्या शब्दाचा वापर........ करू नका.
भाजपाला ऐतिहासिक एक हाती सत्ता मिळवून देणार नरेंद्र मोदी यांची, सर्वानुमते संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
आज भाजपची संसदीय बोर्डाने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले. लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी भावूक झालेत. त्यानंतर अडवाणी यांची बोलण्याची वेळ आली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी झालेत. त्यावेळी भावूक होण्याचे कारण सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक शिवसैनिकांना संसदेत पाठवले, शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा आवाज त्यांनी संसदेत घुमविला. पण लोकशाहीच्या मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण करून पहिल्यांदा ठाकरे घराण्याचा आवाज संसदेच्या वास्तुत घुमविला.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत... पण, त्यांची धास्ती मात्र अंडरवर्ल्ड जगतात आत्तापासूनच पसरलीय.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला प्रस्तावाला अनुमोदन मुलरलीमनोहर जोशी, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराय यांनी दिले.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.
केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.
जीतन राम मांझी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना नितीश कुमार यांनी सांगितलं,
देशाचे पुढील पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची ओळख आगामी काळात सर्वात शक्तीशाली शहर म्हणून होणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास झाला तर ती महाराष्ट्रासाठी खुशखबर असणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी दिल्ली प्रमाणे आपल्या मतदारसंघाला ‘मिनी पीएमओ’ बनवू शकतात. हे मिनी पंतप्रधान कार्यालय वाराणसीसाठी मोदींच्या प्लॅनला मूर्त रूप देऊ शकते.
काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ही कार्यकर्त्यांकडून ही मागणी जोर धरतेय.
नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहेत. तसंच दिल्लीत होणाऱ्या `एनडीए`च्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर आजही दिल्लीत बैठकींचा सिलसिला सुरुच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक आहे.
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
नव्या सरकारचा प्रभाव पहिल्या आठवड्यात कायम आहे. सेन्सेक्सनं बाजार उघडताच 300 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीमध्ये 80 अंशांची वाढ झालीय.
आम चुनाव 2014