Last Updated: Friday, June 20, 2014, 08:35
मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.. आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.
Last Updated: Thursday, June 19, 2014, 15:52
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Last Updated: Thursday, June 19, 2014, 18:08
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
Last Updated: Friday, November 8, 2013, 12:05
ण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:28
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:26
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Last Updated: Wednesday, July 17, 2013, 16:42
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Last Updated: Monday, July 15, 2013, 09:06
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 10:33
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Last Updated: Monday, July 8, 2013, 12:29
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 11:10
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 10:13
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Last Updated: Monday, July 1, 2013, 14:40
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Last Updated: Saturday, June 29, 2013, 15:40
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.
Last Updated: Wednesday, June 26, 2013, 23:12
संत एकनाथांच्या वंशजांमध्ये नाथषष्टीला हंडी फोडण्यावरून हाणामारी झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पालखीचा मान कुणाचा यावरून पुन्हा एकदा वाद पेटला होता.
Last Updated: Sunday, June 9, 2013, 23:26
पालखीचं स्वागत करण्यासाठी यंदा स्वागत कमानी लावू नयेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर पालखी रथावर बसण्याचं मान्यवर लोकांनी टाळावं असाही निर्णय घेण्यात आलाय.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 21:14
अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.
Last Updated: Friday, June 29, 2012, 10:44
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:38
विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.
Last Updated: Sunday, June 24, 2012, 14:55
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटणहून विडणी, पिंपरद, निंबळक फाट्यावरून प्रवास करत काल बरडला मुक्काम केला होता. आज माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते इथं असणार आहे.
Last Updated: Saturday, June 23, 2012, 13:11
आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...
Last Updated: Friday, June 22, 2012, 08:27
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.
Last Updated: Thursday, June 21, 2012, 11:43
पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.
Last Updated: Wednesday, June 20, 2012, 11:28
निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.
Last Updated: Monday, June 18, 2012, 09:01
विठूरायाच्या भेटीसाठी सारे वारकरी आतुर झालेत.. मजल दरमजल करत वार-यांच्या दींड्या आणि पालख्या मार्गक्रमण करत आहेत. लहान थोर, आबालवृद्ध सारेच पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी वारकरी झाल्या होत्या. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून आला.
Last Updated: Sunday, June 17, 2012, 16:02
पुणे-सोलापूर रस्त्यावर सहजपूर इथं कंटेनरच्या धडकेत दोन वारक-यांचा मृत्यू झाला आहे. तसंच 3 ते 4 वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Last Updated: Sunday, June 17, 2012, 09:45
माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होतेय. तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान ठेवतेय. जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार आहे.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:25
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.
Last Updated: Sunday, June 10, 2012, 23:03
तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..
Last Updated: Saturday, June 9, 2012, 22:48
वारी म्हटली की, देहू, आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जाणा-या पालखी सोहळ्यांचीच चर्चा होते. मात्र ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि गुरू यांच्या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळेच झी 24 तासनं वारीच्या उगमस्थानाकडे दर्शकांचं लक्ष वेधलंय.
Last Updated: Wednesday, March 7, 2012, 15:56
सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत.
आणखी >>